Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
  • डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
  • कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
  • हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
  • उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
  • सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
  • छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
  •  डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला, एसआयटी मार्फत चौकशीची डॉ. नातू यांची मागणी
गुहागर

बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला, एसआयटी मार्फत चौकशीची डॉ. नातू यांची मागणी

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaFebruary 1, 2025Updated:February 1, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

गुहागर प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायत येथील बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला दिलेल्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीमार्फत एका व्यक्तीला जन्म दाखला देण्यात आला होता. सदर व्यक्ती मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक केली व सदर चौकशी करत असताना ग्रामपंचायतीने त्या व्यक्तीला बांगलादेशी असताना सुद्धा जन्म दाखला दिला आहे. या प्रकरणाची पाळेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये असू शकतात कारण बांधकाम व्यवसाय, मच्छीमार व्यवसाय यामध्ये अनेक बांगलादेशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत आहेत.

मालेगाव, नाशिक येथील बनावट जन्म दाखले चौकशी करण्याकरता शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचे अध्यक्षतेखाली एक एसआयटी बनवली आहे. त्याचप्रमाणे कोकण विभागाची एक स्वतंत्र विशेष तपास समिती निर्माण करावी किंवा नाशिक येथे निर्माण केलेल्या विशेष तपास समितीकडे कोकण विभागाचे कामही सोपवण्यात यावे. ज्यामुळे कोकण किनारपट्टी मध्ये जवळजवळ प्रत्येक तालुक्यात असणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांची सखोल चौकशी होईल व कोकणातील समुद्रकिनारी घातपाताच्या प्रकाराला आवर घालता येईल. तरी संबंधित प्रशासनाला तातडीने चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी डॉ. नातू यांनी केली आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Article‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’तून रुग्णांना वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे
Next Article कविता : चल मित्रा
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

January 26, 2026
Uncategorized

कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न

January 5, 2026
गुहागर

हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !

December 24, 2025
Top Posts

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025244 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025219 Views

कविता : वायरमन..!

January 13, 2025164 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.