चिपळूण (श्रीकांत कांबळी) : मुंबई गोवा हायवे चे काम गेले अनेक वर्ष संथ गतीने सुरू आहे. त्याचा फटका यावर्षीही मुंबईसह इतर शहरातून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना बसणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्ड्यांच्या साम्राज्याचे जाळे पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कसरत करीत प्रवास करावा लागणार आहे. तसेच रस्त्यांची अवस्था पाहता अपघाताची शाश्वती टाळता येत नाही. चिपळूण मधील सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यावर आवाज उठविला असता सार्वजनिक बांधकाम विभाग व हायवे ठेकेदार यांच्याकडून तात्पूर्ती मलमपट्टी केली जाते. मात्र पुन्हा खड्डे पडल्यामुळे नागरिकांमधून प्रशासन व बांधकाम विभाग यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.
Trending
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
- डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
- कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
- हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
- उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
- सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
- छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
- डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा

