गुहागर [उदय दणदणे] : महावितरण कंपनी अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणा मुळे गुहागर तालुक्यातील पालशेत बाजारपेठ येथील सत्यवान भायनाक कुटुंबियांना गेले काही दिवस घरचा विद्युत प्रवाह बंद असल्याने अंधारात राहावे लागत आहे. त्यांच्या घरा शेजारील दिपक शिरगावकर यांच्या दुकानासमोरील रस्त्यानजीक असलेल्या वीज खांबावर स्पार्क होत असल्याने तसेच सदर वीज खांब जीर्ण अवस्थेत असल्याने येथील लाईनमन यांना वीज खांबावर चढून काम करणे धोकादायक बनले आहे, सदर समस्या भायानक यांनी पालशेत मनसे विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे यांना सांगताच सदर बाबत मनसेचे पालशेत विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे यांनी महावितरण कंपनी पालशेत व्यवस्थापक तसेच उपअभियंता गुहागर यांना फोन द्वारे तात्काळ सदर घटनेची माहिती देऊन सदर धोकादायक वीज खांब त्वरीत बदलण्याची मागणी केली आहे.
Trending
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
- डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
- कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
- हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
- उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
- सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
- छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
- डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा

