मुंबई ,केतन भोज : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून आज साकीनाका येथील सावित्रीबाई फुले शाळेतील मुलींनी मराठी शाळा वाचवण्याचा नारा दिला. हातात फलक घेत मुलींनी यावेळी शासनाकडे मराठी शाळा वाचवा अशी मागणी केली. साकीनाका येथील सावित्रीबाई फुले ही मुलींची शाळा असून 1984 साली तिची स्थापना केली . त्यावेळी शाळेची तीन हजार पट संख्या होतो. शासनाचे मराठी शाळांकडे दुर्लक्ष्य होत असल्याने आज सर्वच मराठी शाळांची दुरवस्था झाली आहे. प्रत्येक मराठी शाळांची पट संख्या कमी होत आहे. साकीनाका येथील सावित्रीबाई फुले या शाळेत यावेळी 185 मुली शिक्षण घेत आहेत. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असतात दुसरीकडे मराठी शाळांची पडझड होत आहे दुःखाची बाब आहे. मराठी शाळा टीकल्याच पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही सावित्रीबाई फुले जयंती दिनी ही मागणी केल्याचे शाळेच्या संचालिका ज्योती सुभेदार यांनी सांगितले.
Trending
- रवींद्र मालुसरे यांना श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेचा शिवकार्यासाठी पुरस्कार जाहीर
- कोंड कारूळ जिल्हा परिषद गटाच्यावतीने आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या जेष्ठांचा सत्कार !
- कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संस्थेची २०२५-२८ कार्यकारणी जाहीर
- रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्राप्त; हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
- कोळी वादळ बृहन्मुंबई महानगर पालिकेवर धडकणार
- बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत- केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
- चारवाडी विकास मंडळ मुंबई वतीने कलगी तुऱ्याचे आयोजन; भू-पंचक्रोशीतील युवा शाहीर प्रथमच आमने सामने
- तवसाळ शाळा-१ च्या कु.शुभ्रा निलेश सुर्वे हिचा शैक्षणिक डबल धमाका !