Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रवींद्र मालुसरे यांना श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेचा शिवकार्यासाठी पुरस्कार जाहीर
  • कोंड कारूळ जिल्हा परिषद गटाच्यावतीने आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या जेष्ठांचा सत्कार !
  • कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संस्थेची २०२५-२८ कार्यकारणी जाहीर
  • रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्राप्त; हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
  • कोळी वादळ बृहन्मुंबई महानगर पालिकेवर धडकणार
  • बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत- केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
  • चारवाडी विकास मंडळ मुंबई वतीने कलगी तुऱ्याचे आयोजन; भू-पंचक्रोशीतील युवा शाहीर प्रथमच आमने सामने
  • तवसाळ शाळा-१ च्या कु.शुभ्रा निलेश सुर्वे हिचा शैक्षणिक डबल धमाका !
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक
महाराष्ट्र

मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 3, 2025Updated:January 3, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

सोलापूर प्रतिनिधी : मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. सोलापूरमध्ये ही घटना घडली आहे. जिल्ह्यातील जेऊरजवळ वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. दगडफेकीमुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-११ डब्ब्याची काच फुटली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मात्र ही दगडफेक कोणी आणि का केली याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही. रेल्वे अधिकारी, आणि स्थानिक पोलिसांकडू या हल्लयाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसवर गुरुवारी (दि.२) रोजी रात्री ९.२० वाजता जेऊर कुईवाडी सेक्शनमधील भाळवणी स्थानकाजवळ अज्ञात व्यक्तिंकडून दगडफेक करण्यात आली. स्थानिक पोलीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून यासंदर्भातील तपास केला जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अशाप्रकारे वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता महाराष्ट्रामध्येही अशी दगडफेक करण्यात आल्याने खरोखरच या बाबतीतही महाराष्ट्राचा युपी, बिहार झालाय का असा प्रश्न विचारला जातोय. अचानकपणे वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. कोणीतरी हुल्लडबाजी करत, कोणी गर्दुल्ल्याने दगडफेक केली का? की अन्य कोणते कारण आहे  याचा शोध आता रेल्वे पोलिसांकडून घेतला जात आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleमुंबईतील धावत्या लोकल ट्रेनच्या गेटवर उभे राहिल्याने तरुणाचे डोके लोखंडी खांबावर आदळल्याने मृत्यू
Next Article मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
Team GuhagarSatta

Related Posts

महाराष्ट्र

रवींद्र मालुसरे यांना श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेचा शिवकार्यासाठी पुरस्कार जाहीर

July 19, 2025
गुहागर

कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संस्थेची २०२५-२८ कार्यकारणी जाहीर

July 16, 2025
महाराष्ट्र

कोळी वादळ बृहन्मुंबई महानगर पालिकेवर धडकणार

July 16, 2025
Top Posts

कविता : वायरमन..!

January 13, 2025135 Views

साहित्यिक प्रकाशक यांचा एकमेकांशी सुसंवाद असावा -डॉ. अ. ना. रसनकुटे

March 31, 2025114 Views

वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

April 26, 2025105 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2025 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.