Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 3, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई वार्ताहार : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील नव्या सुधारणेशी संबंधित जनहित याचिका निकाली काढताना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले. ही योजना जून २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर, दोन वेळा त्यात सुधारणा केली. परंतु, नव्या सुधारणेमुळे योजनेसाठी पात्र महिलांना अर्ज भरताना आणि तो ऑनलाईन अपलोड करताना अनेक अडचणी येऊ शकतात. परिणामी, योजनेचा लाभ घेण्यापासून महिला वंचित राहू शकतात, असा मुद्दा प्रमेय वेल्फेअर फाऊंडेशनने वकील सुमेधा राव यांच्यामार्फत केलेल्या जनहित याचिकेद्वारे उपस्थित केला होता. तसेच, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे राज्य सरकारला आदेश देण्याची मागणी केली होती.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी गुरूवारी सुनावणी झाली. त्यावेळी शासनाच्या संबंधित विभागाच्या उपसचिवांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून योजनेची अंमलबजावणी करताना सुरुवातीच्या काळात अडचणी आल्याचे मान्य केले. तसेच, या अडचणी दूर करण्यासाठी आणि योजनेसाठी पात्र महिलांना अर्ज भरण्याकरिता मदतीसाठी विविध विभागांमधील ११ यंत्रणांची नियुक्ती केल्याचे सांगितले. त्यावेळी योजनेसाठी २.५१ कोटी अर्ज प्राप्त झाले व त्यातील २.४३ कोटींहून अर्ज पात्र ठरवले, तर ९० हजार अर्ज फेटाळण्यात आल्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आली.

तथापि, न्यायालयाने त्याची दखल घेऊन योजनेतील नव्या सुधारणेनुसार महिलांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येणार नाहीत व योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.

 

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleक्रांतिज्योती सावित्रीबाईफुले यांच्या जन्मस्थळी ‘सावित्रीमाई जयंती उत्सव’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न
Next Article एनसीबीकडून मुंबई विमानतळावर अवैध औषधी ड्रग्ज आणि बनावट सिगारेट जप्त
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.